...............सगळे मुंबई ला आले आणि परत दिनक्रम सुरळीत पणे सुरु झाला होता. पण दिनु आपला बेचैन होता.
त्याला फकत एकच ध्यास होता तो रश्मीचा...!!! दिनुला वार्षिक परीक्षेत जेम तेम गुण पडले होते, पण काटावर का होईना दिनु पास झाला होता, घरचे लोक ओरडले त्याला पण ओरडून आता काय होणार आहे...??? त्याला पण खूप वाईट वाटले होते. आपला दिनु बाळ आता हुशार राहिला नव्हता का?............ कदाचित नाही आणि कदाचित हो पण !!! मला तर वाटते आपण कोणाची ही गुणवत्ता त्याच्या अभ्यासातील गुणां पेक्षा त्याच्या स्वभावा वरुण आणि आचरणा वरुण केली तर बरे होईल........ पण तसे होत नाही ना ... बरे जाऊ दे असो !!!
त्याने आता ठरवले होते की सर्व काही विसरून जायचे आणि अभ्यासाला लागायचे .... हो दिनु ने हा विचार केला होता .... तुम्ही म्हणाल असे कसे करू शकत होता तो..... पण त्याच्या कड़े कदाचित दूसरा पर्याय नसावा .....त्याने त्याच्या छोट्याशा हृदया वर मोठठा सा दगड ठेवला होता ............. त्याला सहन झाले असते का ते दडपण ???..........कदाचित नाही, तो ह्या दबावाखाली मुक्त पणे नाही जगु शकत होता ......... मग पुढे काय??
हा हा म्हणता शाळा सुरु झाली होती. आणि नववीतला दिनु अभ्यासाला लागला पण लक्ष्य लागत नव्हते कश्याताच त्याचे......... कसे लागणार म्हणा....??
Monday, September 28, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)

1 comment:
dinu tuzhi gunvatta khoop aahe malaa maahit aahe ........
tu khoop chaangla aahes malaa maahit aahe re
Post a Comment